सोमवार, १५ जून, २०१५

जैवविविधतेचा बळी देऊन केलेला विकास धोकादायक

गिरीश पंजाबी, झिअस पुरस्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना
गिरीश अर्जुन पंजाबी हे वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी इंडिया आणि नेशनल सेंटर फॉर बायोलॉजीकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या पद्युत्तर अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. सह्याद्री भागातील वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या संशोधन आणि प्रयत्नांसाठी आताच त्यांना कार्ल झिअस वन्यजीव संवर्धन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा हा एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे. विख्यात लेखक आणि व्याघ्र संवर्धनात मोलाचे योगदान असलेले वाल्मिक थापर यांच्या अध्यक्षतेखालील समिती या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करते.
मांसाहारी प्राण्यांच्या परिसंस्थांचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण, विज्ञानाधारित संवर्धन या गोष्टींत गिरीश यांना विशेष रुची आहे.

वन्यजीव अभ्यास आणि संवर्धन या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात?
राजस्थानातील सवाई मानसिंग वन्यजीव अभयारण्यातील बलास, जो आता रणथंबोर व्याघ्रप्रकल्पाचा भाग आहे, या ठिकाणी असतांना मला पहिल्यांदा ही जाणीव झाली कि माझी या क्षेत्रात विशेष रुची आहे. त्यावेळी मी अगदी नवशिक्या होतो परंतु दहा दिवस वन संरक्षक म्हणून काम करतांना मला ते शिकायला मिळाले जे शिकण्याची मला खरोखर खूप इच्छा होती. एके दिवशी खूप पाउस पडून गेला होता, तेथील इतर मंडळीसोबत मी एका टेकडीवर बसून सूर्यास्त पहात होतो, मला वाटत त्याच वेळी मी मनाशी निश्चय केला कि मी याच क्षेत्रात काम करीन. २००८ मध्ये माझ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मी एनसीबीएस आणि डब्ल्यूसीएस-इंडिया यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड केली. हा अभ्यासक्रम निसंशयपणे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.   


पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना सादर करावयाच्या शोध प्रबंधासाठी तुम्ही कोल्ह्याची निवड का केली? या संशोधनातून तुम्हाला काय आढळून आले? 
कोल्हा हा प्राणी नेहमीच माझ्या आवडीचा राहिला आहे. मला या सर्वांत लहान श्वानवर्गीय प्राण्याबद्दल अधिक जाणून घेण्याची खूप इच्छा होती. मला आठवत मी माझ्या एका मित्राबरोबर मे महिन्याच्या तळपत्या उन्हात राजस्थानभर या प्राण्यांच्या शोधात बाईकवरून फिरलो होतो. उत्तर-पश्चिम भारतात आढळून येणाऱ्या वाळवंटी कोल्हा या प्रजातीच्या शोधात आम्ही राज्यभरात १२०० किलोमीटर्सचा प्रवास केला. जेव्हा प्रबंधासाठी विषय निवडण्याची वेळ आली तेव्हा मला ती निवड करणे अजिबात अवघड गेले नाही कारण मला कशाचा अभ्यास करायचा आहे हे माझ्या डोक्यात स्पष्ट होते. मी सोलापूर मधील माळढोक (ग्रेट इंडिअन बस्टर्ड) अभयारण्याजवळील मानवी वास्तव्य असलेल्या प्रदेशांत भारतीय कोल्ह्यांच्या निवास-निवडीचा अभ्यास करायचे ठरविले.
आम्हाला असे आढळून आले कि जेथे कृषी क्षेत्र आहे अशा विस्तृत भागात निवासासाठी कोल्हे मोठ्या प्रमाणावर गवताळ प्रदेशाची निवड करतात. जेव्हा क्षेत्र संकुचित असते तेव्हा दृष्टीक्षेपात येणारा परिसर, उंदीर, घुशी इत्यादी खाद्याची उपलब्धता, बांध, विहिरी इत्यादींसारख्या मानव-निर्मित संरचना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. भारतात आज गवताळ प्रदेश अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत आणि या प्रजातीसाठी गवताळ प्रदेशच सर्वांत महत्त्वाचा अधिवास असल्याचे आम्हाला आढळून आले आहे मात्र परिस्थितीशी जुळते घेण्यासाठी या प्राण्यांनी मानव-निर्मित संरचनांचा आधार घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून आले.

संशोधन आणि वन्यजीव अभ्यासासाठी तुम्ही उत्तर पश्चिम घाटाची निवड का केली?
एकतर मला खूप आकर्षक वाटला तो भाग! हा प्रदेश खूप वेगळा आहे. दक्षिण पश्चिम घाट मी बघितलेला आहे पण येथील वनस्पती वेगळ्या आहेत. येथल्या वन्यजीव, सस्तन प्राण्यांवर म्हणावा तितका अभ्यास झालेला नाहीये, हीच गोष्ट माझ्यासाठी प्रेरणादायक ठरली. आता जस जस माझं काम पुढे सरकतंय मला जाणवतंय कि या प्रदेशात अभ्यासाला भरपूर वाव आहे. यामुळे माझ्या रुचित आणखी वाढ होत आहे. जर मी अजून थोडी वर्ष या भागात काम केल तर येथील वन्यजीव संवर्धनात मला चांगले योगदान देता येईल असे वाटते.
हा प्रदेश कोयना वन्यजीव अभयारण्यापासून गोवा कर्नाटका सीमेपर्यंत पसरलेला आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांच्या काही भागांचा समावेश होतो. हे साधारणपणे ७००० चौ.किमी क्षेत्र आहे. यात प्रचंड जैवविविधता आहे.

गिरीश, वन खात्यातील कर्मचाऱ्यासोबत कॅमेरा ट्रॅप बसवतांना

या भागात बरेच पवनचक्की प्रकल्प प्रस्तावित आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
हा प्रदेश वन्यजीवांसाठी आश्रयस्थान आहे. तोही जर आपण विकासाच्या नावाखाली अतिक्रमित केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. या प्रकल्पांसाठी जंगलतोड करावी लागेल, जंगलातून रस्ते निर्माण करावे लागतील यामुळे वन्यजीवांना खूप त्रास होईल. अशाप्रकारे जंगल आणि त्यात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांचे जीवन उध्वस्त करून प्राप्त केल्या गेलेल्या उर्जेला कोणत्या दृष्टीने शाश्वत उर्जा किंवा ग्रीन एनर्जी म्हणता येईल? या ठिकाणी केवळ पक्ष्यांच्याच जवळजवळ २०० प्रजाती आहेत. शासनाला याबद्दल सांगितले गेले पाहिजे. लोकांना जागरूक केले पाहिजे.
तिल्लारी क्षेत्राचच एक उदाहरण पहा. तेथे जवळपास ७०० एकरभर रबर लागवड पसरलेली आहे. २००१ मध्ये याच परिसरात एक वाघाच पिल्लू सापडलं होत. तरीही ती जमीन रबर लागवडीसाठी विकून टाकण्यात आली. (त्या पिल्लाला प्राणी संग्रहालयात ठेवले होते. दोडामार्गमध्ये सापडला म्हणून त्याच नावही दोडा ठेवण्यात आल होत.)
आता परिस्थिती थोडी बदलली आहे. आम्ही तेथे केमेरे वगैरे लावले आहेत. पुरावे आहेत म्हणून आशा वाटते कि या पुढे तरी असे होणार नाही.

तुमचे प्रकल्प आणि तुमच्या आवडीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील वन्यजीव क्षेत्रांना तुम्ही भेटी दिल्या आहेत. याबाबतीत तुमचे निरीक्षण काय आहे? एकंदरीत परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटते?
वन्यजीव आणि त्यांचे अधिवास या बाबतीतील भारताचे वैविध्य प्रचंड आणि नेत्रदीपक आहे. एक देश म्हणून आतापर्यंत ही जैवविविधता जपण्यासाठी आपण केलेले प्रयत्नही खरोखर प्रशंसनीय आहेत. पण अचानक मला आता अस वाटायला लागल आहे कि गोष्टी बदलताहेत, आपल्या या वन्यजीव वारश्याबद्दलचे आपले प्रेम कमी होतांना दिसते आहे. मी जेथे कोठे जातो तेथे मला ‘विकासाच्या’ गप्पा ऐकायला मिळतात, वन्यजीवांचे अधिवास विखंडीत होत आहेत, जैवविविधता नष्ट होत आहे. या नाशामुळे भविष्यात आपल्याला कोणता दिवस पहावा लागेल याची आपल्याला काहीच कल्पना नाही.

उत्तर पश्चिम घाटात मोठे मांसाहारी प्राणी यांच्या क्षेत्रव्याप्तीवरील (ऑक्युपन्सी) एका प्रकल्पावर तुम्ही काम केले आहे. त्याबद्दल आम्हाला सांगा.
हो. मी डॉ. अद्वैत एडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पावर काम केले. यात आम्ही उत्तर पश्चिम घाटात वाघ, बिबटे, ढोले आणि अस्वल किती क्षेत्र (ऑक्युपन्सी) व्यापून राहतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रदेशातील सस्तन प्राणांच्या खूप कमी अभ्यास झाला आहे, त्यांच्या अभ्यासाला मोठा वाव आहे. एखाद्या प्रदेशातील वनप्रदेश, मोठ्या प्रमाणावर भक्ष्याची उपलब्धता आणि मानवी अस्तित्त्व यांचा मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या विभागणीवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास आम्ही केला. या प्रकल्पाला क्रिटीकल इकोसिस्टिम पार्टनरशिप फंड आणि अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड एन्व्हायर्नमेंट यांनी अर्थसहाय्य केले आणि सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीज बेंगलोर यांनी या प्रकल्पाला पाठींबा दिला.
सध्या तुम्ही काम करत असलेला सह्याद्री कॉरीडोर हा प्रकल्प काय आहे?
हा प्रकल्प म्हणजे माझ्या डोक्यातील उपज! परंतु माझ्या या प्रयत्नात मला अनेक संघटना आणि लोकांची मदत लाभली आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्धिष्ट उत्तर पश्चिम घाटात मोठ्या मांसाहारी प्राण्यांना जंगलांत ये-जा करण्यासाठी असलेल्या जोडमार्गांचे संरक्षण करणे, त्यांत सुधारणा करणे आणि प्राण्यांचे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात येणे-जाणे सुकर करणे हे आहे. हे काम या क्षेत्रात ज्यांचे हितसंबंध आहेत त्यांच्या सहभागाशिवाय खचितच संभव नव्हते म्हणून आम्ही या प्रदेशातील वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या लोकांसोबत पार्टनरशिप करण्यावर लक्ष केंद्रित केले. या प्रकल्पात सर्वांत महत्त्वाचा सहभाग हा महाराष्ट्र वन विभागाचा आहे. यांच्याद्वारे संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर कोरीडोर्समध्ये लावलेल्या केमेरा-ट्रेप्समार्फत आम्हाला आश्चर्यकारक अशी माहिती प्राप्त होत आहे.  

महाराष्ट्रातल्या तिल्लारी भागात तुम्ही केलेले काम परिणामकारक ठरले आहे. त्याबद्दल सांगा.
महाराष्ट्रा, गोवा आणि कर्नाटकच्या सीमांवर असलेला तिल्लारी हा एक अद्भुत प्रदेश आहे! २०१० मध्ये मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या क्षेत्र व्याप्तीच्या (ओक्युपन्सी सर्वे) एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने पहिल्यांदा मी हा प्रदेश पाहिला आणि तेव्हापासून मी तिल्लारीच्या मोहातच पडलो. आता आम्ही केमेरा ट्रेप्सद्वारे या प्रदेशातील वन्यजीवांच्या अगदी बारकाईने नोंदी ठेवत आहोत. आम्हाला वाघ आणि हत्तींच्या अस्तित्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या भागात सांबर आणि गवाही मोठ्या प्रमाणावर असल्याचे जाणवते. या भागात वन्यजीव संवर्धनाला खूप मोठा वाव आहे आपण फक्त विकासाच्या बालिश कल्पनांना बळी पडता कामा नये.
नुकत्याच पिल्लांना जन्म दिलेल्या एका मादी बिबट्याचा कॅमेरा-ट्रेप ने घेतलेला फोटो 
तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आलेली वाघाची पाउलखुण
सावंतवाडी-दोडामार्ग भागातील २५ गावांत तुम्ही जलद जैवविविधता सर्वेक्षण केले. यात तुम्हाला काय आढळून आले?
या भागात प्रचंड जैवविविधता आहे आणि याचा सज्जड पुरावा म्हणजे आमच्या केवळ एका आठवड्याच्या जलद सर्वेक्षणात आढळून आलेल्या पशु-पक्षी, वन्यजीव आणि कीटकांच्या अनेक प्रजाती. येथील लोकांना या जैवविविधतेचे महत्त्व माहित आहे. त्यांच्या स्वतःच्या उपजीविकेसाठी ही जैवविविधता कशी आवश्यक आहे हेही त्यांना समजते. मात्र दुर्दैवाने हा प्रदेश पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे घोषित करण्याला विरोध करण्यासाठी त्यांचे कान भरले जात आहेत. या प्रदेशाला प्रस्तावित खाणी आणि रबर लागवडींपासून खूप मोठा धोका निर्माण झाला आहे, यासाठी  शेकडो एकर जमीनीवरील जंगल नष्ट केले जात आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, आशा करूयात यापुढे हे होणार नाही.  

तुमच्या लेखांमधून आणि कामातून संवर्धनासाठी विज्ञानाचा वापर करण्यावर तुम्ही भर देत आला आहात. वन्यजीव संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करता येईल?
संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, विशेषकरून संरक्षित क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी वन्यजीव संरक्षक आणि संशोधक आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून घेऊ शकतात. केमेरा ट्रेप्सचेच उदाहरण घ्या – मी याचा वापर अशा वन्यजीवांच्या नोंदींसाठी करत आहे ज्या या भागात क्वचितच नोंदल्या गेल्या होत्या. मानवी वस्ती जास्त असलेल्या भागात जेथे साधारणपणे वन्यजीव सहसा नजरेस पडत नाहीत त्या ठिकाणी, या तंत्रज्ञानाचा विशेष फायदा होतो. केमेरा ट्रेप्समुळे एकदा आम्ही शिकाऱ्यांनाही पकडले होते. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात एक सांबर मारला होता. त्यांचे चेहरे केमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्यामुळे हे शक्य झाले. आजकाल तर केमेरा ट्रेप्स इमेल/एमएमएसच्या सुविधेसह उपलब्ध झाले आहेत यामुळे संरक्षित प्रदेशांवर वर्तमानात नजर ठेवणे शक्य होते आणि कोणतीही बेकायदेशीर अथवा वन्यजीवांना नुकसान पोहोचवणारी घटना वेळीच थांबवता येते. 
गिरीश, वन खात्यातील कर्मचाऱ्यांसोबत कॅमेरा ट्रॅप बसवतांना

तुम्ही मांसाहारी प्राण्यांच्या परिसंस्थांचा अभ्यास करता आहात. मानव-प्राणी परस्परक्रिया हा या अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, तुम्ही याकडे कसे पाहता?
हो. या प्राण्यांच्या संवर्धनात या क्रिया खूप महत्त्वपूर्ण आहेत. या प्राण्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण सकारात्मक आहे कि नकारात्मक यावरून मानवी वस्तीत हे प्राणी राहू शकतील कि नाही हे ठरत असते. एक सुखद आश्चर्य आहे, मी काम करत असलेल्या काही भागांमध्ये वाघ आणि बिबट्यांना देव मानले जाते आणि लोकांना ते आपल्या गावाभोवती असावेत असे वाटते. परंतु आता जग झपाट्याने बदलत चालले आहे, पैशाला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत वन्यजीव संवार्धानावरील गावकऱ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हा विषय खूप व्यापक आणि क्लिष्ट आहे. यात वेगवेगळे दृष्टीकोण आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रात जेव्हा हत्ती शेतात यायला लागले तेव्हा लोकांनी त्यांच्या पायांच्या ठशांची पूजा केली पण ते परत परत यायला लागले आणि हे लोकही वैतागले. यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. जसे पिक विमा अनिवार्य करणे इत्यादी. संशोधन आणि व्यायास्थापन यांचा योग्य मिलाफ साधने आवश्यक आहे.  

या क्षेत्रात काम करतांना आलेले काही संस्मरणीय अनुभव आम्हाला सांगाल का?
कोयना अभयारण्यातील एक आठवण आहे. २०१० मध्ये आम्ही तेथे ऑक्युपन्सी सर्वे करत होतो आणि अचानक पुढे झुडुपात काहीतरी हालचाल झाली. माझ्या लक्षात आले कि तेथे काहीतरी आहे आणि आम्ही लगेच खाली बसलो. तेवढ्यात त्या झुडुपातून काही शिट्ट्या ऐकू आल्या. ते रान कुत्रे होते. ते आपल्या शिकारीचा पाठलाग करत होते. शिकारीच्या वेळी ते एकमेकांना शिट्टीद्वारे खुणावतात. ही त्यांची एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत आहे. मी कधीच ती शिट्टी ऐकली नव्हती, पहिल्यांदा एवढ्या जवळून ऐकली. ते आमच्यापासून फार तर पाच मीटर अंतरावर असतील परंतु शेवटपर्यंत आम्हाला दिसले नाहीत. रान कुत्रा हा खूप लाजाळू प्राणी आहे तो माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही येतोय हे कळल्यानंतर ते आमच्यापासून दूर गेले परंतु सुरुवातील जेव्हा आम्ही त्यांच्या जवळ असल्याचे त्यांना माहित नव्हते तोपर्यंत त्यांचे वागणे अत्यंत नैसर्गिक होते जे सहसा माणसांना पाहायला मिळत नाही. ते सांबर वगैरे कशाचातरी पाठलाग करत होते. ते व्हिसल वाजवून संवाद साधतात म्हणून त्यांना व्हिसलिंग हंटर्स म्हटले जाते.
यानंतर एक आठवण आहे ती राधानगरीतील. तेथे वाघाने मारलेला एक खूप मोठा गवा पाहिला. तो एक पूर्ण वाढ झालेला नर गवा होता. त्याचे वजन कमीत कमी ७०० ते ८०० किलो तरी असेल. एवढा मोठा गवासुद्धा वाघ मारू शकतो हे पाहून आश्चर्य वाटले. मोठ्या नर वाघाचे वजन २०० ते २२५ किलो असू शकते. मादीचे वजन १०० ते १५० किलोपर्यंत असते. एखाद्या मोठ्या नर वाघानेच तो मारलेला असावा कारण मादी एवढामोठा गवा मारू शकेल असे मला वाटत नाही. असा गवा मारणे म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. त्याला मारून साधारण महिना झाला असेल. तिथे त्याची हाड वगैरे पडलेली होती. त्याच डोक खूप मोठ होत त्यावरून आम्ही अंदाज लावला कि तो ७००-८०० किलोचा असेल. त्या वाटेवर वाघाची खूप विष्टाही पडलेली होती.
जंगलात पायी फिरत असतांना येणारे अनुभव हे खूप वेगळेच असतात. खासच म्हण हव तर! पर्यटन वगैरे करतांना येणाऱ्या अनुभावांहून वेगळेच असतात ते. तुम्ही जेव्हा चालत जंगलात जाता तेव्हा तुम्हाला खूप अनुभव अनपेक्षितपणे येतात. एक सततच्या धोक्याची जाणीव असते. त्याची मजा काही औरच असते.

वन्यजीव पर्यटनाबद्दल आपले काय मत आहे. ते चांगले कि वाईट?
मला वाटत वन्यजीव पर्यटनात तसे वाईट काही नाहीये पण त्यावर नियंत्रण असयला हवे. पर्यटनामुळे वन्यजीवांना थोडाफार व्यत्यय नक्कीच होतो पण तेथे जंगलांच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना पर्यटनातून उत्पन्न प्राप्ती होऊ शकते आणि त्यामुळे वन्यजीव संरक्षणाला त्यांचा पाठींबा मिळू शकतो जो खूप महत्त्वाचा आहे.

भारत आणि एकंदरीत जगाचा विचार करता वन्यजीवांचे, जंगलांचे भविष्य कसे वाटते?
अजूनही आशा आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये. खूप लोक प्रयत्न करताहेत पर्यावरण संरक्षणासाठी. शासनाने मात्र हे मान्य करणे गरजेचे आहे कि आज पर्यावरण संरक्षणाला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकासकामासाठी पर्यावरणाची हानी करणे हे बंद झाले पाहिजे. जे काही विकासप्रकल्प असतील ते पर्यावरण तज्ञांना सोबत घेऊन तयार केले पाहिजेत.
भारताच्या बाबतीत मला वाटत पर्यावरण संरक्षणाला खूप साऱ्या लोकांचा पाठींबा आहे. मानवी हक्क, वन्यजीव, पर्यावरण यांच्या संरक्षणासाठी आज कधी नव्हे इतके लोक काम करताहेत. हा बदल नक्कीच स्फूर्तीदायक आहे.  
जागतिक पातळीवरून विचार करता, लोकांची जागरुकता खूप वाढली आहे तरीही पर्यावरण आणि वन्यजीवांच्या बाबतीत आपण खूप गंभीर संकटात आहोत. जागतिक पातळीवर फोफावलेल्या वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापारामुळे वाघ, सिंह, चित्ता, गेंडा इत्यादी सर्वच मोठ्या प्राण्यांना असलेला धोका खूप वाढला आहे. चीन, जपान, दक्षिणपूर्व एशिया इत्यादी ठिकाणी त्यांची खूप जास्त मागणी आहे. चीन किंवा जपानमध्ये तर हस्तिदंताचा वापर ठसा बनवण्यासाठी केला जातो. प्रत्येक मोठा माणूस त्यापासून स्वतःचा ठसा बनवतो!
कोठे कोठे सकारात्मक गोष्टीही आहेत. युरोपमध्ये बघितले तर लांडगे वगैरे आता सगळीकडे दिसतात. आधी खूप कमी ठिकाणी राहिले होते. तेथे संवर्धनाचे खूप चांगले प्रयत्न झाले आहेत. आफ्रिकेत, भारतात समस्या मोठी आहे. ब्राझीलमध्ये खूप मोठी आहे.

वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन या व्यतिरिक्त तुमच्या आवडी कोणत्या आहेत?
मी या गोष्टीचा क्वचितच विचार केलाय पण आता तू विचारलेच आहेस तर मला हायकिंग खूप आवडते. मला प्रवासवर्णने आणि भारतीय लेखकांचे लिखाण वाचायला आवडते. मला फुटबॉल खेळायला आवडते पण आजकाल त्यासाठी वेळच मिळत नाही. मला सायकलिंगही आवडायचे पण एकदा मोठा अपघात झाला आणि माझे सायकलिंग बंद झाले.

धन्यवाद आणि वन्यजीव संवर्धनाच्या तुम्ही करत असलेल्या या कामात आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्यासोबत आहेत!

सह्याद्रीकॉरीडोर प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील वेबसाईटला भेट द्या :
परीक्षित सूर्यवंशी

@@@@

A foxy kinda love


Girish Arjun Punjabi is an alumnus of the Post graduate program in Wildlife biology & Conservation run by the Wildlife Conservation Society-India and National Centre for Biological Sciences. He has recently been awarded Carl Zeiss award for wildlife conservation for his efforts to conserve wildlife in the northern Sahyadris, through on-ground research and outreach. His interests include carnivore ecology, monitoring wildlife, and science based conservation advocacy. He is currently based in his hometown, Pune.

How did you feel when you first heard that you have won Carl Zeiss award for wildlife conservation?
I felt glad, and then it filled me with humility. I think this award will help me focus on conservation of the wildlife in the northern Sahyadris. This is a great honour and I’m thankful to Valmikji, other members of the selection committee, and ZEISS for this award.

When you truly felt that this is your field of work? How did you turn to wildlife studies?
I think it happened when I was in a place called Balas in Sawai Mansingh wildlife sanctuary in Rajasthan, which is part of the Ranthambore Tiger reserve now. I was a novice then, but living ten-days in a forest guard’s shoes taught me something that I was yearning to learn. I was sitting on a cliff-face with a few others and seeing the sun go down after a heavy downpour, I think I decided to take the plunge then. I took up wildlife studies for my Masters at NCBS and WCS-India in 2008. That course, no doubt, was a turning point in my life.

You studied Indian foxes for you masters’ dissertation, why did you choose foxes (we rarely hear anybody talking about foxes!)? What were your findings?
I’ve always loved foxes! They’re the smallest wild canids around, so I was always keen to learn more about them. I remember doing a mad bike-trip with a colleague in the heat of May across Rajasthan looking for them. We traversed 1200 km of the state trying to locate the desert fox, a species found in north-west India. When the time came for my dissertation, it wasn’t very hard to choose what I wanted to study. I studied den-site selection of Indian foxes in a human-dominated landscape near the GIB sanctuary in Solapur. We found that at the large scale foxes primarily chose grasslands when denning in the agricultural matrix. At the small scale, visibility of the surroundings, presence of rodents, and human-made structures, such as bunds, well-tailings came out to be important. Grasslands are highly threatened habitats in India today, and we found that grasslands were indeed important habitats for this species, but at the same time they appear to have opportunistically used human-made structures.

Your projects and interests have taken you to wildlife areas all over the country, what were your observations, how did you feel?
The diversity of wildlife and habitats is immense and spectacular, and as a country we’ve done a great job in conserving this diversity up till now. But suddenly I feel things have started turning turtle, and we seem to be losing this regard for our wild heritage. Most places I go now, there’s this talk of ‘development’, habitats are being fragmented, biodiversity being lost, and yet little do we know how this loss in biodiversity will affect us in the future.
Then you worked on a project which examined large carnivore occupancy in the northern Western Ghats. Please tell us about it.  
Yes, I was on this project under Dr. Advait Edgaonkar to understand what proportion of area (a.k.a occupancy) tigers, leopards, dholes, and sloth bears occupy in the north Western Ghats, a region still lesser studied for mammals I’d say. We also tried to understand how forest area, large prey availability, and human presence affected large carnivore distribution at a landscape scale. This was funded by Critical Ecosystem Partnership Fund and Ashoka Trust for Research in Ecology and the Environment and supported by Centre for Wildlife Studies, Bangalore.

Presently also you are working on a project – Sahyadri Corridor. What is this project about?
This project’s my brainchild, but I’m thankful a lot of organizations and people have supported my endeavour. The project basically focuses on retaining and improving connectivity for large carnivores in the north Western Ghats. This, of course, is not possible without stakeholder involvement, so we’ve also focused on creating partnerships with people working in different parts of the region. Most importantly the project works closely with the Maharashtra forest department and we’re collecting some incredible information through camera-traps placed outside of PAs in the corridor region.

You have also done important work in Tillari region of Maharashtra, please tell us about it.
Tillari is an amazing region at the tri-junction of Maharashtra, Goa, and Karnataka. I saw the area for the first time during the large carnivore occupancy survey in 2010, ever since I’ve been captivated by Tillari. Now, we’re meticulously documenting what wildlife exists in the region through camera-traps. We’ve found evidence of tigers, elephants, and there seems a reasonably high density of sambar and gaur in the area. This area has great potential for wildlife conservation, if only we can prevent it from falling prey to silly development ideas.
You also did a rapid survey of biodiversity in 25 villages in Sawantwadi-Dodamarg region. What were your impressions?
This area holds a lot of biodiversity and this is evidenced by the fact that we found so much in just a short one-week survey. The people there understand this and how biodiversity is important for their own livelihoods, but are being deceived to oppose the ecologically sensitive area declaration. There is immense threat to this region by proposed mining activities, and rubber plantations that are clearing hundreds of acres of forest. Hopefully, better sense will prevail.

You support science based conservation, how do you think recent technological developments can help conservation?
Technology can help conservation in many ways, especially by helping managers and researchers monitor areas. Take the case of camera-traps as an example- I’ve been using them to document wildlife that was until now never or rarely reported from these parts. Especially in human-dominated landscapes, where wildlife is usually very shy. In one case, we also managed to catch poachers who had killed a sambar deer, as we got clear shots of their faces. Nowadays, camera-traps even come with email/MMS facilities so monitoring can become real-time, helping us act in time.

You study carnivore ecology, human-carnivore interactions is an important aspect of this. How do you look at it?
Yes, these interactions are an important aspect in carnivore conservation. Whether attitudes are positive or negative towards species does determine if they would occur in human-dominated areas or not. It’s amazing to see in some areas where I work, that tigers and leopards are treated as gods and people want to have them around their village. But how these dynamics change in a market-driven world is something we should keep an eye for.

What are your other interests apart from wildlife and environment?
I rarely gave that a thought, but now that you ask me I enjoy hiking a lot. I like reading travelogues, and Indian writing. I love football, but I rarely get to play a game nowadays. I used to like cycling till I had a terrible accident after which I left.

What message that is close to your heart, would you like to pass on to our readers?
Everyone can do their bit for the environment around them. One only needs to try, because even the act of trying will make one feeling satisfied and full of empathy.

Thank you. It was really nice talking to you. Our heartiest wishes will always be with you for the great work you have been doing.

First published in The Hindu BLink :

-Parikshit Suryavanshi


@@@@

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र

नद्यांची जोडणी आणि मोठ्या धरणांच्या उभारणीशिवायही ‘वॉटर स्मार्ट’ मुंबई शक्य आहे! 
जंगल दरी, मध्य वैतरणा धरणासाठी कायमची गमावली गेली. फोटो-परिणीता दांडेकर
आदरणीय मुख्यमंत्रीसाहेब,
राज्याच्या जलसंसाधन विभागात काही पुरोगामी बदलांना चालना दिल्याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन. जसे जे धरण प्रकल्प ७५% पेक्षा जास्त पूर्ण झालेले आहेत तेच सुरु ठेवण्याचा निर्णय, स्वच्छ प्रतिमेच्या स्वतंत्र व्यक्तींची नेमणूक जसे CADAचे मुख्य सचिव म्हणून श्री एच.टी.मेंढेगिरी यांची नियुक्ती, आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या (Economic Survey Report) नियमांत बदल, फक्त पाणी साठवले म्हणजे सिंचन क्षमतेत वाढ झाली असे समजले जाणार नाही असे म्हणणे.
असे असले तरी, ३ जानेवारी २०१५ च्या इंडिअन एक्प्रेस या वर्तमान पत्रात छापून आलेले मुंबईच्या विकास आराखड्याबद्दलचे तुमचे विचार वाचून निराशा झाली. हे शहर तोंड देत असलेल्या जास्तीतजास्त समस्या आणि त्यांवर करता येण्यासारखे उपाय यांची यादी मांडतांना पाणी या सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याला मात्र तुम्ही बगल दिली! त्या पूर्ण बातमीत पाण्याचा उल्लेख फक्त एकदाच केला गेला!
तुम्हाला माहितच आहे कि, पुरेश्या, स्वच्छ आणि खात्रीच्या पिण्याच्या पाण्याचा आणि विश्वासू पाणी नियोजनाचा अभाव या मुंबई आणि मुंबईकरांपुढील, खासकरून गरीबांपुढील प्रमुख समस्या आहेत.
गेल्या वर्षात आम्ही, मुंबईचा पाणी पुरवठा, पाण्याची उपलब्धता, मागणी आणि प्राप्तीची परिस्थिती यांचा अभ्यास केला. याबाबतीत आम्ही आमचा दृष्टीकोण आपल्या पुढे मांडू इच्छितो.
दमणगंगा-पिंजल नदीजोड प्रकल्पाचा एक भाग, भूगड धरणाखाली बुडणार असलेली दरी. फोटो-परिणीता दांडेकर 
कृपया प्रा.माधव गाडगीळ यांची प्रस्तावना लाभलेला, सोबत जोडलेला अहवाल “मुंबई महानगर प्रदेशासाठी पश्चिम घाटाच्या आदिवासी पट्ट्यातील धरणे : अधिक चांगले पर्याय उपलब्ध असतांनाची अन्यायपूर्ण प्रकल्पे” (Dams in tribal belt of Western Ghats for the Mumbai Metropolitan Region: Unjustified projects when better options exist) पाहावा. यात या आणि इतर बाबींबद्दल विस्ताराने लिहिले गेले आहे.
या अहवालातील निष्कर्षांवर आधारित NDTVने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात MCGM आयुक्त श्री सीताराम कुंटे आणि MMRDA मेट्रोपोलिटन आयुक्त श्री यूपीएस मदन यांनी मान्य केले कि, मुंबई आपल्या पाणी समस्येसाठी असे उपाय योजत नाहीये जे अधिक सोपे आहेत, पाण्याचा अकार्यक्षम वापर, पारेषण आणि वितरणात होणारी हेळसांड या मोठ्या समस्या आहेत आणि मोठ्या धरणांच्या दुष्परिणामांचा विचार करता त्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही, विशेषतः इतर अधिक चांगले पर्याय उपलब्ध असतांना.
तुम्हाला हेही माहित आहे कि, मुंबई महानगर प्रदेश (MMR) हा मुंबईच्या पाणी पुरवठयासाठी अधिक धरणांची मागणी करतो आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात अशी १२ धरणे नियोजित आहेत (यात दमणगंगा-पिंजल नदीजोड प्रकल्पाच्या तीन धरणांचाही समावेश आहे) जी एकत्रितपणे १,००,००० हून अधिक आदिवासींना विस्थापित करतील, २२,००० हेक्टर जमीन या धरणांखाली बुडेल ज्यातील ७००० हेक्टर जंगल आणि ७५० हेक्टर जमीन तानसा अभयारण्याची असेल.
दमणगंगा-पिंजल नदीजोड प्रकल्पामुळे प्रभावित आदिवासी फोटो-परिणीता दांडेकर
मुंबईच्या तहानेसाठी द्यावी लागणारी ही नक्कीच एक खूप मोठी सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक किंमत आहे. परंतु या मार्गावर जाण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर आपल्याकडून करून झाला आहे का? कोणत्याही दृष्टीने याला ‘स्मार्ट’ म्हणता येईल का?
कृपया ही वास्तविकता समजून घेण्यासाठी आपले काही क्षण द्या   
·            बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मूळस्त्रोताजवळ पुरवठ्यात कमतरता नाही : MCGM (Municipal Corporation of Greater Mumbai) ला स्त्रोताच्या ठिकाणी ३५२० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. एक कोटी चोवीस लाख सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील, झोपडपट्टी भागात ६८६ एमएलडी पाण्याचा वापर होतो आणि झोपडपट्टी नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांद्वारे १२९७ एमएलडी पाणी वापरले जाते. यांची बेरीज होते १९८३ एमएलडी. याचा अर्थ स्त्रोताच्या ठिकाणी होणारा ३५२० एमएलडीचा पुरवठा हा वास्तविक एकूण मागणीपेक्षा खूप जास्त आहे! यात आपण २६० एमएलडी व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी आणि १२० एमएलडी पुरवठा मार्गात होणारे नुकसान मानले तरीही अधिकचे ११५७ एमएलडी पाणी अजूनही उपलब्ध असले पाहिजे. याचा अर्थ असा कि स्त्रोताच्या ठिकाणी पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३२.८६% पाण्याचा काही हिशेबच नाही. जरी आपण स्त्रोताच्या ठिकाणी होणाऱ्या पुरवठ्याच्या २५% गळती गृहीत धरली (जी खरतरं खूप जास्त होते, ती ५-१०%पेक्षा जास्त नसावी) तरीही अजूनही पुरवठ्याच्या ७.८६% पाण्याचा हिशेब लागत नाही. हे म्हणजे ८८० एमएलडी पाणी, जवळजवळ मुंबई बांधू पाहत असलेल्या दोन मोठ्या धरणांइतके!
·            अतिशयोक्तीपूर्ण मागणी अंदाज (४२४० एमएलडी?!) : शासकीय स्तरावर असे सांगितले जाते कि (पोपटपंची केली जाते) MCGM साठी पाण्याची खरी मागणी ४२४० एमएलडी इतकी आहे आणि सध्यस्थितीत कमीतकमी ७२० एमएलडी पाण्याची तुट आहे. मागणीचा ४२४० एमएलडी हा आकडा २४० एलपीसीडी (liters per capita per day) पाणी पुरवठ्यावर आधारित आहे, जो १९९९ च्या चितळे समितीच्या अहवालात वापरला गेला होता. २४० एलसीपीडी पाणी पुरवठा हा अनावश्यक, असमर्थनीय आणि अस्वीकारार्ह आहे आणि आंतरराष्ट्रीय मानांकनांनुसारही खूपच जास्त आहे!
·            MMR महानगरपालिका या त्यांच्या पाणी वापराबाबत उधळ्या आणि अकार्यक्षम आहेत : MMR महानगरपालिका या अगदी उच्चरवाने जास्त पाण्याची मागणी करीत असल्या तरी, उपलब्ध स्त्रोतांचा त्या ज्याप्रमाणे वापर करीत आहेत ते पाहता त्यांच्या या मागण्यांचे समर्थन कदापि केले जाऊ शकत नाही.
·            नवी मुंबई महानगरपालिकेचा अपवाद वगळता इतर कोणतीही महानगरपालिका आपल्या सांडपाण्यापैकी १५% पाण्यावरही प्रक्रिया करीत नाही. काही महानगरपालिका तर आपल्या सांडपाण्यावर अजिबात प्रक्रिया करीत नाहीत!
·            कार्यरत बल्क वॉटर मीटरच्या अभावी पाण्याच्या लेखापरीक्षणाची स्थितीही निराशाजनक आहे आणि लोकांना वास्तवात किती पाणी पुरवठा होतो आहे याचा विश्वसनीय असा हिशेबच नाहीये.
·            सध्या सर्व महानगरपालिकांची दरडोई पाणी उपलब्धता ही राष्ट्रीय प्रमाण १३५ एलपीसीडीपेक्षा जास्त आहे. ठाणे महानगरपालिका सारख्या क्षेत्रांत, ती २५१ एलपीसीडी पर्यंत जाते! याचवेळी यांसारख्या आणि यांहूनही मोठ्या भागांना आपल्या किमान गरजेइतकेही पाणी मिळत नाही.
·            स्थानिक जलस्त्रोत मरत आहेत, स्थानिक जलस्त्रोतांच्या वापरावर विचार करण्याऐवजी निधीचा वापर केवळ ‘सौंदर्यीकरणा’साठी केला जातो आहे. (सर्व माहिती सिटी सेनिटेशन रिपोर्ट्सवर आधारित)
गारगाई धरणाखाली बुडणारे जंगल फोटो-परिणीता दांडेकर
मुंबईच्या जलसुरक्षिततेसाठी स्मार्ट आणि स्वस्त पर्याय
1.   सांडपाणी प्रक्रिया : सध्यस्थितीत संपूर्ण MMRDA प्रदेशातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी जेमतेम १२-१३% पाण्यावरच प्रक्रिया केली जाते आणि त्याचा पुनर्वापर जवळजवळ होतच नाही. जवळपास १६८९ एमएलडी प्रक्रियारहित सांडपाणी दररोज मुंबईच्या नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांना अवरुद्ध करते. यातील केवळ ५०% ही प्रक्रियाकरून वापरले गेले तर मुंबईला ८४४ एमएलडी पाणी मिळेल, जे जवळजवळ २ मध्य वैतरणा प्रकल्पांएवढे आहे! यामुळे नद्या आणि समुद्र किनारे अधिक स्वच्छ राहतील हे वेगळे.  
2.   MMR प्रदेशात अनेक पारंपारिक जलसाठे आहेत : जे अस्तित्त्वात आहेत आणि अजूनही पाणी पुरवठा करीत आहेत. (उदाहरणार्थ, ठाण्यात ३५ तलाव आहेत, नवी मुंबईमध्ये असे २५ तलाव आहेत, कल्याण डोंबिवलीत २९ आहेत, इत्यादी.) यांपैकी अनेक अनौपचारिकपणे पाणी पुरवठा करतात आणि वर्हाला सारखे काही सक्रियपणे वापरले जातात. परंतु वरवरच्या सौंदर्यीकरणावर भर देणाऱ्या योजना या रचनांच्या पाणी पुरवठा क्षमतेकडे लक्ष देत नाहीत, जो अनेक शहरांसाठी अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि भरवशाचा पर्याय आहे. असे जलसाठे, ओढे-नाले आणि प्रवाह यांचे संरक्षण करण्याची आणि जे मृत झाले आहेत त्यांचे पुनर्रुजीवन करण्याची गरज आहे.
3.   रेन वॉटर हार्वेस्टिंग (वर्षा जल संचयन) आणि भूजल पुनर्भरण : मुंबई महानगरपालिकेच्या रेन वॉटर सेलची परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग कागदावर अस्तित्त्वात आहे, परंतु सरकारकडून या योजनेला जाणीवपूर्वक कोणतीच मदत किंवा उत्तेजन दिले जात नाही. असे असले तरी, नागरिकांनी मात्र सी लाईन अपार्टमेंट, खेतवाडी झोपडपट्टी आणि जागो मुंबई चळवळ सारख्या विलक्षण यशकथा प्रत्यक्षात आणून दाखवल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण (अनेक अहवालांद्वारे भूजलाला कमी लेखले जात असले तरी मुंबईच्या पाणी वास्तवातील बोरवेल्स या एक सततचा महत्त्वाचा भाग आहेत, उदाहरणार्थ, जवळपास ६०% उल्हासनगर भूजलावर अवलंबून आहे!) यांचे पुनर्रुजीवन हे स्थानिक पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सोपे, परवडणारे आणि सर्वोत्कृष्ट उपाय आहेत, विशेषकरून त्या भागासाठी जेथे दर पावसाळ्यात २००० मिमी पाऊस पडतो आणि शहरी भागांत पूर येतो!   
4.   वितरणातील नुकसान आणि पाण्याचा हिशेब किंवा शिस्तीचा अभाव : आमच्या मुल्यांकनानुसार, सध्याची वितरणात होणारी हेळसांड पाणी पुरवठ्याच्या ३०% एवढी आहे. ही हेळसांड साधी १५% नी कमी केली तरी ९४१.३६ एमएलडी पाणी वाचेल!
5.   ही सूचक उदाहरणे आहेत, जी संपूर्ण जगभरातील गतिमान महानगरांद्वारे खूप दूरच्या जलस्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वापरली जातात. याशिवाय आणखीही अनेक पर्याय आहेत जसे, दोन पाईपलाईन्स वापरणे, काही कामांसाठी समुद्राचे पाणी वापरणे इत्यादी. जे सुद्धा मुंबईसाठी सहज वापरून पाहिले जाऊ शकतात. मोठी धरणे बांधण्यापेक्षा स्थानिक पातळीवर साधारण क्षार कमी करणे (desalinization) हा अधिक चांगला आणि स्वस्त पर्याय होऊ शकतो.
खूप दूरवरच्या नवीन धरणांवर अवलंबून राहणे ही केवळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडी आणि पर्यावरणीय तसेच सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाबच नाहीये तर आजच्या तापमान बदलाच्या परिस्थितीचा विचार करता ती अविवेकी आणि बेभरवशाचीही आहे.
एक लवचिक आणि संवेदनशील महानगर हे स्मार्ट, विकेंद्रित आणि स्थानिक पर्यायांवर अभिमानाने उभे असते, सांस्कृतिक विविधतेत भर घालणाऱ्या आदिवासींना विस्थापित करणाऱ्या किंवा पाणलोट क्षेत्रांचे रक्षण करणाऱ्या जंगलांना बुडवून टाकणाऱ्या दूरवरच्या प्रकल्पांवर नाही.
आम्ही आशा करतो कि तुम्ही मुंबईला फक्त एक आर्थिकदृष्ट्या आकर्षक महानगर म्हणूनच नव्हे तर एक शाश्वत, सृजनशील आणि प्रेरणादायी केंद्र म्हणूनही विकसित कराल जे पाण्याच्या कार्यक्षम आणि समन्यायी वापराच्या बाबतीत सर्वोत्तमतेचे प्रात्यक्षिक ठरेल. मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू सारखी मोठी धरणे आणि दमणगंगा-पिंजल सारखे नदीजोड प्रकल्प, जे मुंबईचे संरक्षण करणाऱ्या जंगलांवर बांधले जातील, स्मार्ट नाहीत तर मूर्खपणाचे आणि विनाशकारी पर्याय आहेत.
कवी बा.सी. मर्ढेकरांसारख्या मुंबईप्रेमींनी कल्पना केलेल्या एका नव्या पहाटेची मुंबई आतुरतेने वाट पाहत आहे.
न्हालेल्या जणू गर्भवतीच्यासोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येईमाघामधली प्रभात सुंदर
  
  या प्रयत्नात आमच्याकडून होईल ती मदत करण्यात आम्हाला आनंदच होईल.

  आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत
  आपल्या विश्वासू
  परिणीता दांडेकर, अमृता प्रधान, SANDRP
अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com
@@@@